व्हीएसआरएस मराठी न्युज –शनिवारी (दि. ३० एप्रिल) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला.
या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईसाठी विजयी षटकार डॅनियल सॅम्सने मारला. या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावल्यामुळे सूर्यकुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५८ धावा चोपल्या. राजस्थानच्या १५९ धावांचे आव्हान मुंबईने १९.२ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. यासोबच हंगामातील पहिला विजय आपल्या नावावर केला.
मुंबईकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३९ चेंडूंचा सामना करताना ५१ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. सूर्यकुमारव्यतिरिक्त तिलक वर्माने ३५ धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक इशान किशनने २६ आणि टीम डेविडने २० धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकालाही २० धावांचा आकडा शिवता आला नाही. कर्णधार रोहित शर्माही २ धावा करून तंबूत परतला. मात्र, शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या डॅनियल सॅम्सने पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार मारत मुंबईला विजय मिळवून दिला.
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून ‘जोस द बॉस’ म्हणजेच जोस बटलरने (Jos Buttler) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५२ चेंडूंचा सामना करताना ६७ धावा केल्या. त्याने या धावा करताना ४ षटकार आणि ५ चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त फक्त रविचंद्रन अश्विनला २१ धावा करता आल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार संजू सॅमसन फक्त १६ धावा करून तंबूत परतला.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना ऋतिक शोकीन आणि रिले मेरेडिथ यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शोकीनने ३ षटके गोलंदाजी करताना ४७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच, मेरेडिथने ४ षटकांच्या गोलंदाजीमध्ये २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. या दोघांव्यतिरिक्त डॅनियल सॅम्स आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या विजयामुळे मुंबईच्या खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. मात्र, या पहिले ८ सामने गमावल्यामुळे मुंबईने पुढील ५ सामनेही जिंकले, तरीही त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येणार नाही.
Discussion about this post