व्हीएसआरएस न्युज इंग्लंडने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारताचा धुव्वा उडवत मालिकेत बरोबरी केली आहे.
भारतीय संघाचा तिसऱ्या दिवसातील कामगिरीतील कामगिरी वगळल्यास भारताला पूर्णत: बॅकफूट ठेवत यजमानांनी दमदार कामगिरी केली.
इंग्लंडने ९९.३ षटकात भारताला २७८ धावांमध्ये गुंडाळले.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रॉबिन्सनने तब्बल ५ जणांना तंबूत धाडत भारताला गारद केले. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात पुजारा आणि कोहली बाद झाल्याने भारताचा पराभव निश्चित झाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताची खराब सुरुवात झाली. शतकाच्या प्रतिक्षेत असलेला पुजारा आज एकही धावाची भर न घालता ९१ धावांवर बाद झाला. त्याला रॉबिन्सनने बाद केले. त्यानंतर विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले मात्र त्यानंतर रॉबिन्सननेच विराटला (५५ ) स्लिपमध्ये बाद केले. पाठोपाठ अँडरसनने अजिंक्य रहाणेला ( १० ) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत भारताची अवस्था ५ बाद २३९ अशी केली.
त्यानंतर आलेल्या पंतलाही रॉबिन्सननेच परतीचा रस्ता दाखवला. त्यामुळे भारताला सहावा झटकाही २३९ धावांवरच बसला. शमी आणि इशांत शर्माही लागोपाठ बाद झाले. त्यामुळे पहिल्या सत्रातच भारताने तब्बल सहा गडी गमावल्याने भारताचा पराभव जवळपास निश्चित झाला. त्यानंतर भारताचे शेपूट इंग्लंडने झटपट कापून काढले व विजय लांबणार नाही याची काळजी घेतली. जडेजाने केलेल्या ३० धावांच्या खेळीमुळे भारताचा पराभव काहीसा लांबला.
Discussion about this post