व्हीएसआरएस मराठी न्युज -आशिया चषक 2022 मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात, भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 19.5 षटकांत केवळ 147 धावा करू शकला. 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या.
केएल राहुलच्या रूपाने भारतीय संघाने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 46 चेंडूत 49 धावांची भागीदारी झाली. विराट 35आणि रोहित 12धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने जडेजासोबत चौथ्या विकेटसाठी 31 चेंडूत 36 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार 18 धावा करून बाद झाला.
हार्दिकच्या तीन चौकारांनी सामन्याचे चित्र फिरवले
हार्दिक पांड्याने 19व्या षटकात हरिस रौफच्या चेंडूवर तीन चौकार मारले. इथून भारतीय संघावरील दडपण दूर झाले आणि बाकीच्या धावा सहज केल्या. भारताला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 21 धावांची गरज होती, पण 19व्या षटकात हार्दिकने 14 धावा घेत सामना भारताच्या बाजूने वळवला.
Discussion about this post