व्हीएसआरएस मराठी न्युज -भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला टी20 सामना खेळवला गेला.
यावेळी भारताने 68 धावांनी सामना जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. पण याच सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक दमदार असा रेकार्ड आपल्या नावे केला आहे.रोहितने सामन्यात अर्धशतक केलं असून यासोबतच त्याने आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन नावे केले आहेत. त्याने आपल्या नावावर 3 हजार 343 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलला मागे टाकलं आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे.
रोहित शर्माने हा रेकॉर्ड करतच सामनाही भारताला जिंकवून दिला. यासोबत त्याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यात भारताने 68 धावांनी विजय मिळवला. सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने कर्णधार रोहितचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीने भारताचा डाव सावरत 190 धावा केल्या. त्यानंतर 191 धावा करण्यासाठी मैदानात आलेला वेस्ट इंडीजचा संघ 122 धावाच करु शकला. भारताच्या फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी केली. ज्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ 68 धावांनी पराभूत झाला.
Discussion about this post