व्हीएसआरएस मराठी न्युज -टी-20 आंतरराष्ट्रीय मधला टीम इंडियाचा हा लागोपाठ १० वा विजय आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांचा पराभव केला. तसंच न्यूझीलंडचा ३-० आणि वेस्ट इंडिजचाही ३-० ने पराभव केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातली दुसरी टी-२० मॅच आता शनिवारी धर्मशालामध्ये खेळवली जाणार आहे.
भारताचा हा सलग १० वा टी-२० विजय आहे आणि ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण, रोहितने संघाच्या चुकांवर बोट ठेवताना सहकाऱ्यांना इशारा दिला. “तुम्हाला असा पाठिंबा मिळाला, तर हे असे घट्ट नाते तयार होते. इशान किशनची क्षमता मी चांगली आहे आणि त्याला आज त्या क्षमतेने खेळताना पाहून आनंद झाला. सहाव्या षटकानंतर त्याची खेळी बहरत गेली. मैदानावर जाऊन त्याने फक्त चेंडू टोलवले नाही, तर गॅपमधून धावा काढल्या. रवींद्र जडेजासाठीही मी खूप आनंदी आहे. त्याच्याकडून आम्हाला अधिक अपेक्षा आहेत आणि म्हणून त्याला आज फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले. पुढील सामन्यातही असाच प्रयोग तुम्हाला दिसेल. तो चांगल्या फॉर्मात आहे, विशेषतः कसोटीत आणि त्याचा आम्हाला मर्यादित षटकांच्या सामन्यात उपयोग करून घ्यायचा आहे, असे रोहित म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की, मला मोठ्या मैदानावर खेळायला आवडते, कारण तेथे फलंदाजाची खरी कसोटी लागते. कोलकातात तुम्हाला षटकार खेचण्यासाठी चेंडूला फक्त दिशा दाखवावी लागले. या सामन्यातही काही झेल सुटले आणि या स्तरावर हे अपेक्षित नाही. फिल्डींग कोचना त्यावर आता काम करावे लागेल. ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ मला हवा आहे.
टी-२० वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांचा पराभव केला. तसंच न्यूझीलंडचा ३-० आणि वेस्ट इंडिजचाही ३-० ने पराभव केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातली दुसरी टी-२० मॅच आता शनिवारी धर्मशालामध्ये खेळवली जाणार आहे.
Discussion about this post