व्हीएसआरएस न्युज कसोटी मालिका जिंकलेल्या भारतीय संघाची आजपासून इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेद्वारे दोन्ही संघांना आगामी काळात भारतात होत असलेल्या विश्वकरंडक टी-20 स्पर्धेसाठी चांगला सराव करण्याची नामी संधी आहे. अहमदाबादच्याच मैदानावर या मालिकेतील सर्व पाचही सामने होणार आहेत.
भारत वि. इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा इंग्लंडच्या बाजूनं लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार इयान माॅर्गन याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.