व्हीएसआरएस न्युज –
पुणे-खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे यंदा जोरदार पाऊस झाल्याने भरली आहेत. आतापर्यंत, धरणातून 11.83 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे.
यंदा मान्सूनचे जोरदार आगमन झाले. त्यानंतर मात्र काही दिवस पावसाने दडी मारली. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने धरणे 100 टक्के भरली. यावेळी धरणातून पाणी सोडण्यात आले.
मागील तीन-चार दिवसांपासून परतीच्या पावसानेसुद्धा जोरदार हजेरी लावल्याने धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार
धरणांची मिळून एकूण क्षमता 29.13 टीमसी इतकी
आहे.पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणातून
सोडण्यात आलेले पाणी खडकवासला धरणात जमा
होते.