व्हीएसआरएस न्युज इंदापूर- मागील महिन्यात इंदापूर तालुक्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले. यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला; परंतु काही दिवसांनी पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला आहे.
शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरण्या केल्याने आता त्यांचे लक्ष दमदार पावसाकडे लागले आहे. पाऊस असाच लांबला तर उसाला हुमणी लागण्याची शक्यता आहे. दररोज आकाशात ढग तयार होऊन आता जोरदार पाऊस बरसेल, असे वाटते;
परंतु पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. एकंदरीतच इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. पेरण्या झाल्यानंतर पिके बऱ्यापैकी उगवून आली आहेत; मात्र आता खऱ्या अर्थाने पावसाची गरज असताना पडत नसल्याने शेतकरी कमालीचा निराश आहे.
पिंपरी चिंचवड, पुण्यासह राज्य व देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/F15gWz9ZWZv6LHIo37Jkb7
Discussion about this post