व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण दोनवेळा शंभर टक्के भरले असताना शहरवासियांची तहान एक दिवसाआड पाणी दिले जाते. नागरिकांची दररोज पाणीपुरवठ्याची मागणी होते आहे. परंतु, जोपर्यंत 50 एमएलडी अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध होईल, तेव्हा नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिली आहे. त्यांनी आणखी वर्षभर सुरळित पाणीपुरवठ्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार, हे स्पष्ट केले आहे.
आयुक्हत हर्डिकर म्हणाले की, पिंपरी चिंचवडची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाणी पुरवठ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येत आहेत. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्या आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पांच्या कामांना गती देवून सर्व कामे तातडीने पुर्ण करण्यात येत आहे. या योजनेतून वर्षभरात अतिरिक्त शंभर एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने पवना जलवाहिनी प्रकल्प महत्वकांशी आहे. या प्रकल्पावरील स्थगिती उठवण्यासाठी आमचा राज्यस्तरावर पाठपुरावा सुरु आहेत. त्यामुळे पवना जलवाहिनी प्रकल्पांचा प्रशासकीय पातळीवरील आराखडा तयार करण्यात येत आहे. पवना धरणात शहराला केवळ 425 एमएलडी पाणी कोटा राखीव आहे. पण शहरवासियांची तहान भागवण्यासाठी 480 एमएलडी पर्यंत अतिरिक्त पाणी साठा उचलला जात आहे. परंतू, पवना जलवाहिनीमुळे पाणी गळती रोखण्यात यश येईल. शिवाय 30 टक्के पाणी बचत होईल. तसेच शहराला पाणी कमी पडू लागल्यास आपण आणखी 600 एमएलडी पर्यंत अतिरिक्त पाणी उचलले जाणार आहे.
शहरात अमृत योजनेंतून चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी दोन टप्प्यांतील कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात शहरातील पहिल्या टप्प्यात 40 टक्के आणि दुस-या टप्प्यांत 60 टक्के काम करण्यात येत आहे. त्या दोन्ही टप्प्यांतील सुमारे 80 टक्के काम पुर्ण झाले आहे. तसेच उर्वरीत काम येत्या डिसेंबरअखेर पुर्ण होतील. शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. तसेच शहरातील अनधिकृत नळ तोडणी मोहीम हाती घेण्यात आलीय. त्यानूसार पाणी पुरवठा विभागाकडून अनधिकृत नळ जोडणीधारकांवर कारवाई करण्यात येईल. याशिवाय रावेत पंपींग स्टेशनला पाणी उचलण्याची क्षमता वाढवण्याबाबत काम अंतिम टप्प्यात आले. हे काम डिसेंबरपर्यंत पुर्ण होईल, असेही हर्डिकर यांनी सांगितले.