व्हीएसआरएस न्युज -तळेगाव देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे.विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाने प्रेरीत व्हावे. गुणवंत विद्यार्थी ही शैक्षणिक संस्थेची संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत.मोठी स्वप्ने पहिल्या शिवाय मोठे होता येत नाही. शिक्षणाने विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे.
विद्यार्थ्यांना आपल्यातील क्षमता ओळखता आली पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे यांनी केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
बाळा भेगडे पुढे म्हणाले,लोकमान्य टिळक आणि
अण्णासाहेब विजापूरकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा नावलौकिक मोठा आहे. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये विविध कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपली ध्येय साध्य करावीत.
प्रास्ताविक डॉ. जयश्री सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानदेव रणशूर यांनी केले. महेशभाई शाह यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे नियोजन डॉ.जयश्री सुरवसे, यांनी केले.