व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -ओबीसी’ आरक्षणाबाबत हे सरकार डबल, ट्रिपल ढोलकी आणि केवळ ढोलकीच वाजवत आहे. हे सरकार काहीच करत नाही. सरकारमधील सर्व नेते केवळ भाषणे करतात.
दोन वर्षात राज्य सरकार ‘ट्रिपल टेस्ट’ का करू शकले नाही, याचे उत्तर सरकारमधील नेत्यांनी दिले पाहिजे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिले आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण अबाधित राहाण्यासाठी ट्रिपल टेस्ट ची पुर्तता करण्याचे सुचित केलेले आहे.त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नुकतेच अध्यक्ष आणि पाच सदस्यांची समर्पित आयोगाचे गठण केलेले आहे. सदर आयोग हा सध्या इंपिरिकल डाटा गोळा करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौर्यावर असुन आज आयोगाने पुणे विभागात भेट दिली आणि ओबीसी आणि भटके विमुक्तांचे म्हणणे लेखी स्वरुपात स्विकारले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाला (ओबीसी) आरक्षण देण्याबाबतचे समर्थन करणारे निवेदन समर्पित आयोगाचे प्रमुख श्री.बंठिया यांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे सदस्य श्री.एच.बी.पटेल साहेब व श्री.नरेश गीते साहेब यांना माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय योगेश आण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
सदर प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रल्हाद सायकर ,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख वीणाताई सोनवलकर व प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा श्री मनोज ब्राह्मणकर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री ऋषिकेश भाऊ रासकर व सरचिटणीस कैलास सानप व उपाध्यक्ष श्री शंकर लोंढे , युवक अध्यक्ष राजेश डोंगरे . सौ जयश्री श्री नेहुल कुदळे पुणे शहरचे प्रभारी श्री.गणेश कळमकर,श्री.दिपक माने, पुणे शहर संपर्क प्रमुख श्री.नंदकुमार गोसावी,श्री. यशोधन आखाडे,श्री.राजेंद्र पाषाणकर,श्री.विकी ढोले, सौ.स्मिताताई गायकवाड,श्री. दिनेश रासकर,श्री.विशाल केदारी, श्री. संदिप कर्डेकर आणि भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा आणि भटके विमुक्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Discussion about this post