व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
सिद्धबेटा जवळील इंद्रायणी नदीतील बंधाऱ्याची फारच मोठी दुरवस्था झाल्याने याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापनचे आळंदी शहर अध्यक्ष किरण प्रकाश नरके यांनी आळंदी नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांना निवेदन दिले.
या निवेदनात इंद्रायणी नदीवरील बंधारा धोकेदायक अवस्थेत दिसून येत असून बंधाऱ्याचे काही दगड निघालेले दिसून येत असून त्याबाबतीत शहानिशा करून योग्य ती करवाई व डागडुजी करावी.असे या निवेदनात लिहण्यात आले आहे. निवेदन देते वेळी
महिला आघाडीच्या सचिव शुभांगी यादव महिला आघाडीच्या सहसचिव रुपाली गायकवाड व मनसैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.सिद्धबेटा जवळील बंधारा हा ब्रिटिशकालीन असून या बंधाऱ्याची मुदत ही संपलेली आहे. या धोकादायक बंधाऱ्यावरून अनेक नागरीक रोज ये –जा करत असतात.बंधाऱ्यावरील सिमेंट चे बांधकाम ठिक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत.बंधाऱ्यावरील लोखंडी पाईपलाईन वरून नागरिक चालतना ही दिसतात.तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही बंधाऱ्याच्या कमानिमित्त ये–जा करावी लागते. बंधाऱ्यावरील पाईपलाईन ही एके ठिकाणी लिकेज दिसत आहे.काही नागरिक बंधाऱ्यावरील पाणी निघणाऱ्या ठिकाणी म्हणजेच लिकेज व पाईपलाईन वॉल असणाऱ्या ठिकाणी जाऊन स्नान करतात व तेथेच कपडे धुतात.काही वर्षांपूर्वी बंधाऱ्यावरून ये –जा करू नये म्हणून लोखंडी जाळ्या ही बसवण्यात आले होत्या.त्या ही सद्यस्थितीत दिसत नाहीत.
ये–जा करणाऱ्या नागरिकांसाठी हा बंधारा धोकादायक असुरक्षित आहे असा फलक ही तिथे पालिकेचा दिसत नाही.योग्य वेळी बंधाऱ्याची डागडुजी दुरूस्ती गेली नाहीतर बंधारा फुटू ही शकतो.याकडे प्रशासना चे लक्ष कधी जाईल?बंधाऱ्याची दुरुस्ती कधी सुरू होईल?
Discussion about this post