भोपाळ । व्हीएसआरएस न्यूज ।
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्यात. यावेळी, त्यांनी मशिदीतील पहाटेच्या ‘अजान’ला आक्षेप घेतलाय. भोपाळच्या बैरसिया भागात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात खासदार प्रज्ञा सिंह बोलत होत्या. यावेळी, ‘जगात कोणताही धर्म नाही केवळ सनातन धर्म आहे’ तसंच ‘आम्ही सर्वधर्म सद्भावाची भावना मानतो’ अशी वक्तव्यंही त्यांनी उपस्थितांसमोर केली. पहाटे ‘अजान’मुळे केवळ लोकांची झोपमोड होत नाही तर रुग्णांचा रक्तदाबही वाढतो, असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलंय. सकाळी पूजा-अर्चनाही होते. ‘ब्रह्म मुहूर्ताला’ ध्यानधारणेत असणाऱ्यांचं ध्यान भंग होतं, ‘आरती’तही विघ्न येतं’ असं म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
‘सकाळी ५.०० वाजल्यापासून हे आवाज येणं सुरू होते. सगळ्यांनी झोपमोड होते. रुग्णांचा त्रास वाढतो. साधूसंन्याशीही सकाळी ४.०० ते ५.०० वाजता ध्यानसाधना करतात. परंतु, याची कुणालाही पर्वा नाही. जबरदस्तीनं लोक माईक लावतात’, असं म्हणत प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीम धर्माच्या पवित्र मानल्या जाणारा ‘अजान’ हा शब्द न उच्चारता टीका केली.
पुनरीक्षण कार्यक्रमाला, अन ओघाने मतदार यादीला महत्व आहे. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमसुध्दा. हे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यंदा लोकशाही दीपावली स्पर्धा आयोजित केली आहे. मतदार याद्यांच्या अद्ययावती करणासाठी आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असते. यंदा हा कार्यक्रम १ नोव्हेंबर त ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवला जाणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप मतदार यादी प्रकाशित केली जाईल. महत्वाचं म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०२२ रोजी १८ किवा अधिक वय असलेले नागरिक मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकतील. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.
महाराष्ट्राच्या विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्रात दिवाळी विविध पध्दतीने साजरी केली जात असली. तरी आकाशदिवा आणि रांगोळी मात्र घरोघरी दिसतात. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी ही मतदार नोंदणी असते, हे लक्षात घेऊन आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना, नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावं यासाठी आवाहन करता येईल. आकाशदिवा आणि रांगोळी यामध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतीकांचा वापर करता येईल. उदा. डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन इ. वापरता येईल. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे; चुकीच्या तपशिलात दुरुस्त्या कराव्यात, याकरता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करता येईल.
Discussion about this post