व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:दि.१३ राष्ट्रीय रेड्डी यल्लम समाज धर्मशाळा आळंदी देहूफाटा जवळ आज दि.१३ रोजी ११ वा. रुग्ण हक्क परिषदे तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
रुग्ण हक्क परिषदे चे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यावेळेस म्हणाले २ वर्षाच्या कोरोनाच्या काळात बाहेर फिरणे अवघड झाले होते.आरोग्य सेवेची उणीव भासत होती. देशात ,राज्यात आरोग्य सेवा कमी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.सध्या च्या सरकारने
राहिलेली अडीच वर्ष आरोग्य सेवेसाठी समर्पित करावीत.देशात विविध कायदे आहेत.तसेच डॉक्टरां साठी कायदा आहे. पण रुग्णांच्या हितासाठी कायदे होणे गरजेचे आहे.आताच घडलेले रुबी हॉस्पिटलमधील घटनेचे त्यांनी उदाहरण दिले.काही हॉस्पिटलमध्ये होणारी गैरप्रकार,लूट आळा बसण्यासाठी
रुग्णांच्या हिता करता कायदा व्हायला हवा.त्या कायद्यात योग्य अश्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी.
शरद पवार यांनी समाजातील विकासा च्या दृष्टीने महत्त्व पूर्ण कार्य केले आहे. स्त्रींयांच्या हक्क व कायदा साठी त्यांचे महत्व पूर्ण योगदान लाभले आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार मध्ये त्यांना महत्वपूर्ण स्थान आहे.ते स्थान पाहूनच त्यांना पत्रलेखन करणार आहोत.
अनेक वर्षातील परिस्थिती पाहता आरोग्य क्षेत्राची दयनीय अवस्था झाली आहे. यासाठीच रुग्ण हक्का परिषद अनेक नागरिकांचे लाखो रुपयांचे बिल माफ करून देण्यासाठी रूग्णांना त्यांच्या मोफत उपचारांचा हक्क-अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने कृतिशील आहे. गांधी आंबेडकर विचारांच्या मार्गाने संघर्ष उभा करीत आहोत.मात्र तरीही फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क परिषद कायदा लागू झाला तर येथील सर्वसामान्य नागरिकांची पर्यायाने नागरिकांचे,रुग्णांचे शोषण थांबेल,लूट थांबेल हे पटवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषद शरद पवार यांना ३०हजार पत्र लिहणार आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून १ हजार नागरिकांकडून यासंदर्भात पत्रलेखन करण्यात येईल.
देशात आरोग्य सेवेचे रुग्णांसाठी लाखों रुपयांचे विविध निधी आहेत ते निधी नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत.त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे.आरोग्य व शिक्षण मूलभूत अधिकार आहेत तर आरोग्य सेवे वर सरकारने खर्च करून चांगली दर्जाची,चांगल्या सोई सुविधेचा सरकारी हॉस्पिटल बनवली पाहिजेत.जी बंद अवस्थेत असतील तिला पुनर्जीवन दिले पाहिजे.काही आम्हाला म्हणाले हॉस्पिटल वर ताशोरे ,टीका करणे सोपे असते.प्रत्यक्ष कार्य करणे अवघड त्यामुळे आळंदीत पुढील महिन्यात २० जून रोजी आरएचपी हॉस्पिटल द्वारे सेवा देण्यास सुरू करणार आहोत.विविध योजना असतात त्या नागरिकांसाठी पोहचवण्यासाठी सरकार व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून कार्य पार पाडणार आहोत.आई व पत्नीचे दागिने गहाण ठेवून पुण्यात कोव्हिडं सेंटर उभे केले.
यामुळे ७० लाखांचे कर्ज ही अजून बाकी आहे.तरी हॉस्पिटल निर्मिती साठी व सेवेसाठी लागणारा निधी हा विविध ग्रामपंचायती मधून उपलब्ध होईल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा ही चालू आहे.नागरिकांसाठी महत्व पूर्ण आरोग्य योजना मार्फत आरोग्य आधार कार्ड ३००रु.देणार आहोत.त्याचा वापर
रुग्ण हक्क परिषद रुग्णांच्या सेवेसाठी करणार आहे. असे या पत्रकार परिषदेत सांगितले.
या कार्यक्रमाचे संयोजक रुग्ण हक्क परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक खेंडकर,अतुल धायरकर, दत्तात्रय कारंडे, अर्पणा साठे,कृष्णा कुयटे,माणिक थोरवे,बळीराम सावंगेकर,नितीन चाफळकर,तानाजी दाभाडे सहसंयोजक संदेश तापकीर हे उपस्थित होते.
Discussion about this post