व्हीएसआरएस मराठी न्युज – केंद्र सरकारने महागाई ही वाढवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खूप त्रास होत आहे त्यामुळे विरोधी पक्ष मागच्या वर्षापासून आंदोलन करत आहेत आज पुणे शहर काँग्रेसतर्फे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची पत्रकार परिषद रस्त्यावर घेण्यात आली तेव्हा अतुल लोंढे यांनी पत्रकारांशी संवाद साधला .अतुल लोंढे म्हणाले ,प्रश्न हा सामान्य माणसांच्या अस्तित्वाचा आहे म्हणून प्रेस रस्त्यावर घेतली.
मोदींनी निवडून यायच्या आधी जे वचन दिले ती ते पूर्ण करतील अशी अपेक्षा होती. पण ते काही केले नाही. अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदींवर केली.
अतुल लोंढे म्हणाले ,सामान्य माणसाचं जगणं हे या सरकारने मुश्किल केलं आहे.केंद्र सरकार आपल खापर हे नेहमी दुसऱ्यावर फोडत आहे.आठ वर्षात १०० टक्के भाव वाढ झाली आहे. ही तर सर्व जनतेची फसवणूक आहे. आता तर गव्हाचा स्टॉक देखील संपत आला आहे. तुम्ही म्हणाला होता रुपया पडला की पंतप्रधानांची इज्जत पडते मग आता डॉलर एवढं पडला तर मग कुणाची इज्जत पडली आहे . असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.
लोंढे म्हणाले, केंद्र सरकार राज्य सरकारसोबत बदमाशी करत आहे.सिलेंडर वर राज्य सरकार टॅक्स लावत नाही.सबसिडी सोडायला सांगितल आणि त्यात घोळ केला.उज्वला गॅस योजनेत देखील फसवल. ही तर जगणं मुश्किल करणारी महागाई. असे टीका अतुल लोंढे यांनी मोदी सरकारवर केली.
अतुल लोंढे यांनी जोराज्यात मशिदीवरील भोग्याचा वाद सुरू आहे. त्यावर सुद्धा भाष्य केले, अतुल लोंढे म्हणाले,मंदिर मस्जिद करून पोट भरणार नाही.७० वर्ष आम्ही एकोप्याने राहीलो आणि आता जातीय तेढ निर्माण केला जात आहे.विकास हाच आमचा उद्देश आहे. असे लोंढे म्हणाले.
महानगरपालिका निवडणुका थोड्या दिवसात होण्याची शक्यता आहे त्यामुळे आघाडी होणार का हा प्रश्न आहे त्यावर पत्रकारांनी विचारले,तुम्ही निवडणूकित राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार का.
त्यावर अतुल लोंढे म्हणाले,१०० टक्के राष्ट्रवादिने पाटीत खंजीर खुपसला.अनेक निवडणुकीत त्यांनी धोका दिला आहे. असा आरोपही त्यांनी राष्ट्रवादीवर केला.
पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत
पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, माजी महापौर कवीचंद भाट, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, सेवादल शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मलशेट्टी, दिनकर भालेकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितूले आदी उपस्थित होते.
क्रुड ऑईलचे दर साठ डॉलरपेक्षा कमी असताना केंद्र सरकारने भाववाढ करून 27 लाख कोटी रुपये सामान्य नागरिकांच्या खिशातून काढून घेतले. महागाईबाबत निर्लज्जपणाचा कळस म्हणजे भाजप आहे. भाजपच्या काळात कर्जाचे प्रमाण सकल उत्पन्नाच्या 90 टक्केपर्यंत झाले आहे अजूनही कर्ज घेणे सातत्याने सुरू आहे. राज्य सरकारने सीएनजीवरील कर साडेतेरा टक्के वरून तीन टक्क्यांवर आणला आणि केंद्र सरकारने पुन्हा त्यात वाढ केली. सामान्य माणसांच्या विरोधातील धोरण केंद्रातील भाजप सरकार राबवित आहे अशी टीका करत अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राष्ट्रद्रोहाचे कलम लोकशाहीत योग्य नाही हे काँग्रेसचे धोरण आहे. देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे.
केंद्रातील भाजपाला भ्रष्टाचाराची लागलेली कीड पिंपरी- चिंचवड शहरापर्यंत आली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड शहरातील पहिली केंद्र सरकारची कंपनी हिंदुस्तान एंटीबायोटिक्सची स्थापना करण्यात आली. 51 वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. शहराचे पहिले महापौर म्हणून काँग्रेस पक्षाने ज्ञानेश्वर लांडगे यांना संधी दिली. या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये काँग्रेस पक्षाचे योगदान आहे तसेच या शहराला सजवण्यात, नटवण्यात आणि वाढवण्यात शहरातील कष्टकरी कामगार वर्गांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या लांडगे साहेबांना शहराचा प्रथम महापौर होण्याचा सन्मान काँग्रेसने दिला त्यांचे चिरंजीव मागील पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर निवडून आले. मागील वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवित असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महापालिकेच्या प्रशासकीय भवनात अटक केली. ही घटना शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणारी आहे, असेही ते म्हणाले.
मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारा प्रामुख्याने प्रश्न म्हणजे अपुरा पाणी पुरवठा. पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी पवना धरण ते रावेत पंप हाऊस पर्यंत बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना कॉँग्रेसच्या काळात मंजूर करण्यात आली. परंतु मागील पाच वर्षात या योजनेत काहीही प्रगती झालेली नाही. भाजपचे पदाधिकारी शहरात असताना एक बोलतात आणि मावळातील नागरिकांना दुसरे सांगतात. भाजपच्या या दुटप्पीधोरणामुळे शहरवासीयांचे हजारो कोटी रुपये बुडण्याचा धोका निर्माण झाल्याचे लोंढे म्हणाले.
Discussion about this post