व्हीएसआरएस मराठी न्युज -११ मे १९९८ मध्ये भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत राजस्थानच्या पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. त्यानंतरच अण्वस्त्रे असलेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट झाले. त्यानंतर १३ मे रोजी दोन विभक्त चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे नेतृत्व तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. यानंतर ११ मे १९९९ रोजी प्रथमच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.
देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मेला साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे.
भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या योगदानाचे स्मरण करून तत्कालीन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय दरवर्षी 11 मे रोजी त्याचे आयोजन करते. त्यासाठी दरवर्षी एक थीमही ठरवली जाते. याशिवाय तंत्रज्ञान संस्था आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आता अलिकडेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची हाक दिली आहे. पण भारताला खऱ्या अर्थाने पूर्ण आत्मनिर्भर बनवायचे असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्यच होणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाला देशाच्या प्रगतीत खूप महत्व आहे. त्यामुळे हा दिवस भारतासाठी मोठा आहे, त्यामुळेच भारतभर हा साजरा होतो.
Discussion about this post