व्हीएसआरएस न्युज आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावला नाही. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आज संध्याकाळी 7-30 वाजता सुरुवात होणार आहे. दुबईच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. यातच दुबईतून क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची माहिती समोर आहे. दुबईत संध्याकाळी स्वच्छ हवामान असून पावसाची कोणतीही शक्यता नाही. तसेच क्रिकेटसाठी अगदी उत्तम हवामान आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत एकूण 12 वेळा टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात आमने सामने आले आहेत आणि यामध्ये पाकिस्तानला एकदाही विजय मिळवला आलेला नाही. या 12 सामन्यांपैकी 5 सामने टी-20 विश्वचषकातील, तर 7 सामने एकदिवसीय विश्वचषकातील आहेत. भारत आजच्या सामन्यात विजयाची परंपरा कायम ठेवेल, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहेत.
Discussion about this post