व्हीएसआरएस न्युज मुंबई -राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. जे नियम सध्या आहेत ते तसेच राहणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा करण्यात आली. निर्बंध शिथिल केले जार्तील अशी शक्यता होती, पण ‘जैसे थे’च परिस्थिती ठेवण्यावरच सरकारचा कल पाहण्यास मिळाला आहे.
राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यांत रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्केरुग्ण आहे.
त्यामुळे लेव्हल-3 मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
तसेच ज्या व्यापाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी दुकाने खुले ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले. करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे.
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली की, आधी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचं सर्टिफिकेट घेतलं जातं. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असं टोपे म्हणाले.
तज्ज्ञांनी करोना साथीच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर करोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हाएकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.
Discussion about this post