व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
हजेरी मारुती चौकात काही महिन्यांपासून फूटपाथ वर पाईप लाईन लिकेज झालेली असुन काही महिन्यां पासून त्यातून निघणारे पाणी रस्त्यावर येत असून ते पाणी वाया जात आहे.तसेच सिद्धबेटाजवळ असलेल्या बंधाऱ्यावर लोखंडी पाण्याची पाईपलाईन आहे.
ती हीसद्यस्थितीत लिकेज दिसून येत आहे. दररोज तेथून शेकडो लिटर पाणी वाया जात असतानाचे चित्र दिसून येत आहे.हीच ती नगरपालिका आहे, भामा आसखेड धरण येथील तांत्रिक दोषामुळे ह्या नगरपालिकेला पाणीपुरवठा झालेला नव्हता.त्यामुळे शहरात नागरिकांना चार दिवस पाणीपुरवठा ही करू शकली नाही.आणि त्यावेळेस व नेहमी नागरिकांना पाण्या संदर्भात ,वेळोवेळी जन जागृती करत असते.पाणी नेहमी जपून वापरा,पाण्याची बचत करा,पाण्याचा अपव्यय टाळा.सध्या जर नगरपालिकेचेच स्वतः च्याच या चुकांकडे दुर्लक्ष असेल , तर नागरिकांनी यातून कोणता बोध घ्यावा?
बंधाऱ्यावर लहान मुले ,मोठी माणसे पाणी भरताना,स्नान करताना ही दिसतात.बंधाऱ्या ची स्थिती सध्या धोकादायक झाली असून
त्यावर सध्या लहान मुले वावरताना दिसत आहे. सुस्थितीत नसलेल्या त्या बंधाऱ्या वरून नागरिक ,लहान मुले चालत असताना एखादी दुर्घटना घटली तर जबाबदार कोण?असा प्रश्न ही येथे निर्माण होत आहे.
सोशल मीडियावरही तेथील त्या स्थितीबाबत व तेथील पाणी गळती बाबत फोटो व्हायरल झाले होते. आळंदी शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र तिथून अगदी जवळ आहे .परंतु आळंदी नगरपालिका प्रशासनाचे बंधाऱ्या वरील पाईपलाईन पाणी गळती कडे पूर्ण पणे दुर्लक्ष दिसून येत आहे.
Discussion about this post