व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-दि.२४ आज विश्व श्रीराम सेना समाजिक संगणक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली विश्व श्रीराम सेना सदस्याच्या वतीने संपूर्ण आळंदी शहरात विविध भागात नगरपालिकेच्या वतीने डास प्रतिबंध फवारणी करण्याबाबत मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद अंकुश जाधव साहेब यांच्या नावे आळंदी नगरपरीषदेच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
आळंदी शहरात डासांचा उपद्रव/त्रास वाढल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे डेंगू ,मलेरिया तसेच थंडी, ताप इ. सारखे आजाराचे प्रमाण वाढले आहे. आळंदी शहरात विविध भागात अनारोग्याचे वातावरण दिसून येत आहे.
पालिकेतर्फे सद्यस्थितीत डासाची पैदास घरात होऊ नये यासाठी घरा घरात जाऊन पाणी साठवणूक करणाऱ्या टाक्यांमध्ये जंतू नाशक औषध टाकले जात आहे. पालिका नक्कीच चांगले कार्य करत आहे.परंतु विविध ठिकाणी घरा भोवती, उघड्या वर पावसामुळे पाणी ही साचत आहे. तसेच आषाढी वारी (सोहळा)ही झालेला आहे. विविध ठिकाणी बाहेर अस्वच्छता झाल्याने झाल्या ने डासांची पैदास वाढण्याची शक्यता ही आहे.
सद्यस्थितीत आळंदी शहरातील विविध भागात डेंगूचे ही रुग्ण आढळून येत आहेत.
त्यामुळे आळंदी शहरात विविध भागात डास प्रतिबंधक फवारणी व्हावी.त्यासाठी पालिकेतर्फे फॉगिंग मशीन फिरवावी तसेच जर्म किलर(डास प्रतिबंधक पावडर)ही फवारणी ही संपूर्ण आळंदी शहरात करण्यात यावी.
असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Discussion about this post