व्हीएसआरएस न्युज पिंपरी –रेशन कार्डधारकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत रेशन दुकानात जाऊन रेशन कार्डमधील नमूद सर्व व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन त्याचे व्हेरिफिकेशन करणे शासनाने सक्तीचे केले आहे.
अन्यथा रेशनकार्ड मधून सदर नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी रेशनकार्ड धारकांची राहील.
आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या. तसेच कुटुंबातील नमूद सर्व व्यक्तींचे अपडेट केलेल्या आधार कार्ड आणि शिधापत्रिका यांची छायांकित प्रत रेशन दुकानात ३० जून पर्यंत जमा करावी.
शासनाने आदेश काढल्यानंतरही अनेक ग्राहक हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. यामुळे पुढील महिन्यात धान्य मिळण्याचा मार्ग कठीण होणार आहे. ज्या कार्डधारकांचे ई-केवायसी पूर्ण झाले अशांनाच धान्य वितरित करण्याचे आदेश आहेत. कुटुंबात किती सदस्य कार्यरत आहे हे तपासण्यासाठी ई- केवायसी करण्यात येत आहे. यामुळे वास्तव समोर येणार आहे. यासोबतच कार्डमधून नाव कमी न करता धान्य मिळविणार्यांची सं’या यामुळे निर्बंधात येणार आहे. यातून शासनाचा आर्थिक खर्च वाचणार आहे.
Discussion about this post