व्हीएसआरएस न्युज –उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये मन सुन्न करणारी दुर्घटना घडली आहे. एका गावामध्ये आयोजित भोलेबाबा प्रवचनादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू झालसा आहे.
या अपघातात शंभरापेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. प्रवचन संपल्यानंतर भाविक निघाले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ भागात फुलाई गावात भोलेबाबा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रवचन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थितीत होते. आधीच पावसाने पाठ फिरवल्यामुळे परिसरात प्रचंड उकाडा होता. जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा मोठ्या संख्येनं भाविक घराकडे निघाले होते. पण त्यावेळी अचानक एकच गोंधळ उडाला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये 107 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो भाविक जखमी झाले आहे. अजूनही जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मृत भाविकांची ओळख पटवली जात आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हातरस चेंगराचेंगरीतील मृतांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. 24 तासांत चौकशी अहवाल मागवला आहे. कार्यक्रम आयोजकांवर एफआयआर दाखल करून मोठी कारवाई करण्याच्या तयारीत प्रशासन आहे.
Discussion about this post