व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांच्या मुदती संपल्याने तिथे प्रशासक आलेत. ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका पुढे गेल्यात. ओबीसींनासुद्धा जागा मिळायला हव्यात म्हणून आमचे सरकार प्रयत्नशील आहे.
अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.
वारजे माळवाडी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.मी आमदार रमेश वांजळे यांच्या सुनेचे हार्दिक अभिनंदन करत आहे त्यांनी वडील गेल्यानंतर ही आपल्या प्रभागात आपले काम सुरू केले. आज त्यांच्या प्रभागातील जलकुंभचे उदघाटना त्यांच्या आर्थिक प्रयत्नामुळे होत आहे असे अजित पवार म्हणाले.
महानगरपालिका निवडणुका जरी कुठे गेल्या असल्या तरी एका एका प्रभागात सात-सात आठ-आठ ताकदीचे कार्यकर्ते आहेत. त्यातल्या तिघांनाच मला तिकीट देता येणार आहे. तेव्हा बाकीच्यांनी हट्ट धरू नये. आम्हालाही समजून घ्यावे. निवडणुका लागतील तेव्हा लागतील. तुम्ही काम करत राहा. असे अजित पवार म्हणाले.
मुळा-मुठा नदीच पुनरुज्जीवन व्हायला हवे. पण यावर पर्यावरणवादी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेत. त्याचा विचार करावाच लागणार आहे, असे ते म्हणाले. तर बरेच पक्ष भूमिपूजन करून राजकीय फायदा घेण्याच काम करत असतात. मलादेखील काही अधिकारी म्हणतात, दादा आपण भूमिपूजन करून घेऊ. मला स्वतःला हे पटत नाही, असे पवार यावेळी म्हणाले.
Discussion about this post