व्हीएसआरएस मराठी न्युज -केंद्र सरकारने नियम करावा वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी भूमिका नाही. केंद्र सरकारनं देश पातळीवर एक नियम करावा आणि नियमांची अंमलबावणी देशभर करावी, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्टाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यांवर बंदी घातली आहे आणि इतर वेळी आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलं.
काही राजकीय पक्षांनी भोंग्यांसंदर्भात डेडलाईन दिली आहे. मात्र, भोंगे काढण्यासंदर्भात सरकार काही करणार नाही. ज्यांनी भोंगे लावले असतील तेच यांसंदर्भातील निर्णय घेतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मशिदीतील लाऊडस्पीकर संदर्भात महत्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते. ‘3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही.
Discussion about this post