व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:दि.११ संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आषाढी यात्रा २०२२ नियोजन करिता मा. उपविभागीय आधिकारी उपविभाग राजगुरूनगर विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दि.११रोजी सायं.५ वाजता भक्त निवास आळंदी देवस्थान येथे आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत प्रांत आधिकारी विक्रांत चव्हाण यांनी विविध संबंधित आधिकारी यांना वारी नियोजना बद्दल सूचना आदेश दिले.यावेळेस ते म्हणाले वारकरी भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी दर्शनबारी संदर्भात हवेली विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी त्वरित पत्रव्यवहार व संपर्क करावा. वारी काळात भाविकांना पाणी टंचाई भासू नये यासाठी टॅंकर द्वारे पाणी पाणीपुरवठा व्हावा यासंबंधित त्या त्या संस्थेशी पत्रव्यवहार व संपर्क करण्यास सांगितले. तसेच अपुरी शौचालय पडत असतील तर फिरते शौचालय यासंबंधीत पुरेश्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
पालिकेला याबाबतीत नियोजन करण्यास सांगितले. आळंदी ग्रामस्थांच्या वतीने संतोष भोसले यांनी आळंदी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो हे यावेळी सांगितले व अतिक्रमण कारवाई व्यवस्थित पूर्ण पणे व्हावी ही मागणी त्यांनी केली.
प्रांत आधिकारी यांनी वारी काळात रोज ७ दिवस पाणीपुरवठा गावठाण विभाग व हवेली विभागात व्हावा.यासाठी नियोजन करावे.यासाठी संबंधित अधिकारी यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क ही साधला.फुटपाथ व रस्त्यावर असलेले अतिक्रमण विरोधी कारवाई व्यवस्थित पूर्ण पणे करण्यास सांगितली .पाण्यासाठी वारी काळात २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा.विविध ठिकाणी विद्युत पुरवठा संबंधित असणाऱ्या अडचणी समस्या दूर करण्यात याव्यात.असे विद्युत आधिकारी यांना आदेश दिले. इंद्रायणी नदी मध्ये दुर्घटना घडू नये यासाठी बोट व्यवस्था नियोजनाचा प्रस्ताव सांगितला.
या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान च्या वतीने आषाढ पायीवारी पालखी सोहळ्या करिता नियोजन व सूचना संदर्भात पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी पत्राद्वारे माहिती दिली व सांगितली.या पत्रात लिहिले आहे की वारी काळात वारकरी भाविकांसाठी वैतागेश्वर मंदिरा जवळील दर्शनमंडप जागा उपलब्ध व्हावी. या काळात भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध व्हावे.आळंदी शहरात अखंडीत लाईट व्यवस्था राहावी.यात्रेमध्ये नदीवर व मंदिर परिसरात चोऱ्या माऱ्या अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त असावा. दिंड्या व दिंडीकऱ्यांची वाहने प्रस्थानचे दिवशी सकाळ पर्यंत येत असतात,त्यांना आळंदी शहरात प्रवेश देण्यात यावा.जादा रुग्णवाहिका व अग्निशमकदलाची गाडी असावी तसेच सर्व सोयींनीयुक्त वैद्यकीय पथक मंदिर,दर्शनरांग तसेच आळंदी शहरात विविध ठिकाणी असावे. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
श्रींच्या पालखीला खांदा देण्याचा मान आळंदी ग्रामस्थ व विविध स्थानिक मंडळे यांना असतो त्यामुळे त्यांना मंदिर प्रवेश करिता ओळखपत्र देण्यात येईल.वारी निमित्त मंदिरात असणाऱ्या सोयी सुविधा व वारी सोहळा संदर्भातील नियोजन यात सांगितले आहे.
यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव,तहसील डॉ.वैशाली वाघमारे,चाकण सह. आयुक्त पोलीस प्रेरणा कट्टे ,आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, देवस्थान व्यस्थापक ज्ञानेश्वर वीर विविध विभागाचे अधिकारी वर्ग,आळंदी ग्रामस्थ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post