व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे . विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यावर सारखे टीका करत आहेत. त्यावर ती यात्रा राजकीय यात्रा नाही.आज राहुल गांधी हे पक्षासाठी नव्हे तर देशासाठी निघाले आहे.ज्यांना देशाच्या बरोबर राहायचं असेल त्यांना निमंत्रणाची गरज नाही.राज्यात जेव्हा यात्रा येईल तेव्हा जे समविचारी पक्ष आहे .त्यांना निमंत्रण देण्यात येईल.अस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मंथन शिबिराचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार मोहन जोशी, अजय सिंह यादव उपस्थित होते.
ओबीसी समाजाची जातनिहाय गणना ही केंद्रानेच केली पाहिजे.राज्याने नव्हे.आज जे ओबीसी समाजाचा फुटबॉल केलं जात आहे.ते करू नये.केंद्र सरकारने जे संविधानात आहे ते केंद्र सरकारने देश भरात लागू करावं.ही मागणी महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाची आहे .अस देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.
Discussion about this post