मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) | राज्यात सतत हवामान व वातावरण बदलामुळं मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, राज्यात मागील आठवड्यात ढगाळ वातावरणासह गारपीट तसेच हलक्या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. पश्चिमी विक्षोभामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या प्रभावाने अवकाळीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कमाल तापमान 38 अंशापुढे जात असताना १३ मार्चपासून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मराठवाडा-विदर्भ भागांवर गारपीटसह पाऊस पडल्यामुळं शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, उद्यापासून राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून म्हणजे 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता असल्यानं हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
गारपीटसह पावसाचे हजेरी
जळगावमधील चोपडा तालुक्यात सकाळपासून अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. राज्यातील अनेक भागात तुफान वारा तसेच गारपीटसह पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय बुलढाण्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. नंदूरबारमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. तर नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळं गहू तसेच द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळं काढणीला आलेली रब्बी पिके धोक्यात आली आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसीच्या मदतीची सरकारकडून बळीराजा वाट बघत असताना, दुसरीकडे उद्यापासून देखील पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे.तर दुसरीकडे विकारांचे आजार तसेच वातावरणातील बदलामुळं विविध आजार होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस म्हणजे १३ ते १५ मार्चपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. आधीच नुकसानाने मोडलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभा राहिले आहे.
आजार बळवण्याची शक्यता
मागील काही महिन्यांपासून वातावरणातील बदल व सातत्याने हवामानातील बदल यामुळं कधी पाऊस, तर कधी गारपीठ तर कधी अचनाक थंडी सुरु आहे, त्यामुळं याचा आरोग्यावर परिणाम होत असून, यामुळं विकाराचे आजार तसेच अन्य आजार हे बळावत चालले आहेत, तसेच राज्यात काही ठिकाणी पाऊव व गारपीठ झाल्यामुळं त्याचा फटका शेती पिकांना बसला आहे.
Discussion about this post