व्हीएसआरएस न्युज आज कोजागिरी पौर्णिमा! शरद ऋतूत येणारी ही पौर्णिमा उत्साह आणि सकारात्मक वातावरण घेऊन येते. या ऋतुबदलात मसाला दूध पिऊन आपण शरीराला हिवाळ्यासाठी सज्ज करतो. हे अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक असल्यामुळे प्रत्येकाने आवर्जून याचा आनंद कोजागिरी पौर्णिमेलाच नव्हे, तर इतर वेळेसही घेतला पाहिजे.
कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.
कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात.
या वर्षी कोजागरी पौर्णिमा ३० ऑक्टोबर २०२० या दिवशी साजरी करा ! शुक्रवार, ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते. या वर्षी ‘अधिक आश्विन मास’ असल्याने निज आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयसमयी असणारी तिथी ग्राह्य धरली जाते. हिंदु पंचांगानुसार आश्विन मासात मध्यरात्रीला असणार्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ पासून ३१.१०.२०२० या रात्री ८.१९ वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. ३०.१०.२०२० या दिवशी मध्यरात्रीला पौर्णिमा असल्याने कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.
आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, ‘नवान्न पौर्णिमा’ किंवा ‘शरद पौर्णिमा’ या नावांनी ओळखले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होते, त्या दिवशी ‘नवान्न पौर्णिमा’ साजरी केली जाते.
अ. आश्विन पौर्णिमेला उत्तररात्री लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे ?’, असे विचारते; म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ असे म्हणतात.
आ. आश्विन पौर्णिमेला शेतकरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पूजा करून त्याचा नैवेद्य दाखवतात; म्हणून या पौर्णिमेला ‘नवान्न पौर्णिमा’ असे म्हणतात.
इ. आश्विन पौर्णिमा शरदऋतूत येते; म्हणून या पौर्णिमेला ‘शरद पौर्णिमा’ असे म्हणतात.
अ. वर्षातील या दिवशी मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते, म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (१०:२१) सांगितले आहे.
आ. मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते.
इ. या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील श्री लक्ष्मीरूपी इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात. या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह, तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त होते. या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते.
ई. कोजागरी पौर्णिमेला वातावरणात प्रक्षेपित होणार्या लहरी
दूध – दूध लहानापासून मोठय़ांपर्यंत सर्वांसाठीच अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक समजले जाते. यात उपयुक्त कर्बोदके, प्रथिने, पॅल्शियम आणि उपयुक्त स्निग्ध पदार्थ यांचा समावेश असतो. दुधामुळे मन शांत राहते व झोपही शांत लागते.
साखर – बेताच्या प्रमाणात साखर घातल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
सुका मेवा – काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, बेदाणे इत्यादी मसाला दुधात घातले जाते. यात प्रथिने, पॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक असतात. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात, त्याचबरोबर ऊर्जाही देतात.
वेलची, जायफळ, हळद, केशर – वेलची आणि जायफळ सुगंध देतात आणि केशराचे अनेक आरोग्यदायी गुण दुधात उतरतात. हे सर्व जिन्नस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
इतर वेळेस आपण मसाला दूध मधल्या वेळेत किंवा संध्याकाळी घेऊ शकतो. मुलांसाठी हे दूध खूप उपयुक्त आहे. कोणतेही इतर पेय घेण्यापेक्षा मसाला दूध हे सर्वात आरोग्यदायी आहे.
मसाला दूध : साहित्य – 1 लि. दूध, काजू, बदामाची भरड पूड, पिस्त्याचे काप, वेलची पूड, जायफळ पूड, केशर दुधात भिजवलेले, पाव चमचा हळद, चारोळ्या, बेदाणे, साखर (चवीनुसार).
कृती –
1 लि. दूध पातेल्यात उकळवून घ्यावे आणि थोडे दाट होईपर्यंत उकळू द्यावे. मग त्यात काजू, बदाम पूड, वेलची, जायफळ पूड, बेदाणे, चारोळ्या, हळद, केशर हे सर्व घालून मंद उकळवावे. चवीनुसार साखर घालून पिस्त्याचे काप आणि चारोळ्यांनी सजवून गरम मसाला दुधाचा आनंद घ्यावा.