व्हीएसआरएस न्युज उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कायद्याचा आराखडा तयार झाला असून, तो लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. त्यानंतर या कायद्याला सभागृहाची मंजुरी घेण्यात येईल.
उत्तर प्रदेशातील योगी सरकार मांडणार असलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचे असेच आहे. उत्तर प्रदेशातील 152 भाजप आमदारांना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत. एका आमदाराला तर आठ मुले आहेत. गंमत म्हणजे जे मंत्री हे विधेयक मांडणार आहेत, त्यांनाच सहा अपत्ये आहेत! मोदी सरकारमध्ये असलेल्या उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनाही 3 ते 5 अपत्ये आहेत.
यात दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना सरकारी लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे. याशिवायही इतर अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र, या तरतुदी करण्यापूर्वी योगी सरकारने आपल्या पक्षाच्या आमदारांकडे बघायला हवे, अशी सूचक प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटली आहे.
योगी मंत्रिमंडळातील रामनरेश अग्निहोत्री यांना सहा, मुकुट बिहारी वर्मा यांना पाच तर राजेंद्र प्रतापसिंह, लक्ष्मीनारायण चौधरी, दारासिंह चौहान यांना प्रत्येकी चार अपत्ये आहेत. शाहजहांपूर येथील भाजप आमदार रोशनलाल वर्मा यांना आठ अपत्ये आहेत. बहराईचच्या भाजप आमदार माधुरी वर्मा यांना सात तर रॉबर्टगंंज येथील आमदार पकौडीलाल यांनाही सात अपत्ये आहेत.
मोदी सरकारमध्ये असलेल्या उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांपैकी भानुप्रताप वर्मा यांना पाच, बी. एल. वर्मा यांना पाच, कौशल किशोर यांना चार तर अजय मिश्र यांना तीन व राजनाथ सिंह यांना तीन अपत्ये आहेत. विरोधी पक्षाच्या 50 पेक्षा जास्त आमदारांना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत. विरोधी पक्ष असलेले सपा व बसपाच्या पाच खासदारांनाही दोनपेक्षा जास्त मुले आहेत. फजलुर रहमान, डॉ. एस. टी. हसन, अफजल अन्सारी, संगीता आझाद, वुंâवर दानिश आली यांचा यात समावेश आहे.
Discussion about this post