व्हीएसआरएस न्युज कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करत येत असताना केंद्राने आपत्कालीन पॅकेजची घोषणा केली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवीन आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी 23 हजार 123 कोटी मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 15 हजार कोटी केंद्र सरकार, तर 8 हजार कोटींचं वाटप राज्यांना करण्यात येणार असल्याचं मांडविया यांनी सांगितलं.
736 जिल्ह्यांमध्ये बालरोग विभाग स्थापन करण्यात येणार असून 20 हजार आयसीयू बेड्स तयार करण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं सशक्तीकरण करणं हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच 1 लाख कोटी रुपये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
बाजार समित्या आणखी मजबूत करण्यात येतील. त्यांना अधिक संसाधनं दिली जातील. मंडया संपवल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post