व्हीएसआरएस न्युज माेताळा – दि १६ सप्टेंबर २१ (गुरुवार): मोताळा तालुक्यात अतिवृष्टी होऊन आज आठ दिवस होवून सुद्धा नुकसानग्रस्तांना अजुनही मदत मिळाली नाही. यावरुन आक्रमक हाेत मा. आ. हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी माेताळा येथे तहसीलदार दालनात ठिय्या आंदोलन केले. ‘जोपर्यंत मदत मिळत नाही किंवा ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तहसीलदारांचे दालन सोडणार नाही’ अशी आक्रमक भूमिका हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी यावेळी घेतली.
यावेळी हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या समवेत प्रकाश बस्सी, महेंद्र गवई, नानाभाऊ देशमुख, गजुभाऊ मामलकर, सचिन महाजन, कृष्णा खराटे, सुकलाल पाटील, बाळुभाऊ खाकरे, प्रदीप जैन व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. त्यानंतर हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी मा उपविभागीय अधीकारी निवासी उपजिल्हाधिकारी व मा जिल्हाधीकारी यांच्याशी फोनवरती चर्चा केल्यानंतर उद्या ४ वाजेपर्यत मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगीत करण्यात आले. ‘उदया मदत न मिळाल्यास नुकसानग्रस्थासह पुन्हा ठिय्या आदोलन परत सुरू करण्यात येईल’ असेही हर्षवर्धनदादा सपकाळ म्हणाले.!
Discussion about this post