व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. राज्यात कोरोनाचे सावट अजूनही कायम आहे. त्यामुळे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लवकरात लवकर उरकण्याचा सरकारचा मानस आहे.
तरीही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरणार आहे.
पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, सुरेश वरपूडकर, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. वरपूडकर हे काँग्रेसचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आहेत. तर थोपटे यांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.
Discussion about this post