व्हीएसआरएस न्युज महाराष्ट्राचा देशाच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा. त्यासाठी आम्ही ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मिशन कवच कुंडल योजना राबवणार आहे. दररोज किमान १५ लाख लसीकऱण झालं पाहिजे असं ध्येय आहे.
नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारकडून राज्यात 8 तारखेपासून मिशन कवच कुंडल योजना राबवली जाणार आहे. ही योजना 14 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 6 दिवस चालवली जाणार आहे. या योजनेंतर्गरात राज्यात 15 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांसह आणि संबंधित भागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना लवकरात लवकर लशींच्या दोन्ही मात्रा देण्याकडे राज्य सरकार लक्ष्य देत आहे, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.
आजपर्यंत लसीकरणाची टक्केवारी पाहता ६२ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. महाराष्ट्राला ९ कोटी १५ लाख एवढंं एकूण उद्दिष्ट आहे. यापैकी ६ कोटी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आहे. ३ कोटी २० लाख लसीकरण झालं तर राज्यातील १८ वर्षांच्या सर्व नागरिकांना पहिला डोस देऊन पूर्ण होईल. यामुळे लोकांना संरक्षण मिळेल. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ही अडीच कोटींच्या घरात आहेत. ३० टक्के दोन डोस पुर्ण केले आहेत. उरलेले ३ कोटी डोस दिले तर तिसऱ्या लाटेची भीती कमी होण्यास मदत होईल.
महाराष्ट्रात बुधवारी 4 लाख 49 हजार 64 जणांना लस देण्यात आली आहे. तर, राज्यात एकूण 8 कोटी 46 लाख 48 हजार 653 जणांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
Discussion about this post