व्हीएसआरएस मराठी न्युज –देशातील ८० कोटी गरिबांना दरमहा पाच किलो मोफत अन्नधान्य देणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएमजीकेएवाय) आणखी पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयाबद्दल माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.
कोरोनावेळी गरजूंना मोफत अन्नधान्य देण्यासाठी केंद्राने २०२० मध्ये ‘पीएमजीकेएवाय’ योजना सुरू केली होती. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (एनएफएसए) अंतर्गत मिळणाऱ्या ५ किलो अनुदानित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो मोफत अन्नधान्य दिले जाते.
Discussion about this post