व्हीएसआरएस मराठी न्युज -मुंबईतीलवांद्रे टर्मिनस ते जोधपूर प्रवास करणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाला आहे. ट्रेनचे आठ डबे रुळवरुन घसरले आहेत.
घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना राजस्थान राज्यातील पाली येथे जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा स्टेशनदरम्यान पहाटे 3.27 वाजता घडली. वांद्रेहून निघालेली ही ट्रेन जोधपूरला निघाली होती.
उत्तर पश्चिम रेल्वेच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या घटने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रेल्वेचे डबे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने एक मदत आणि बचाव कार्यासाठी आणि अपघातावेळी आवश्यक यंत्रणांनी युक्त अशी कार्यन्वित असलेली गाडी घटनास्थळी पाठवून दिली.
Discussion about this post