व्हीएसआरएस मराठी न्युज –काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला.
अदानीच्या महाघोटाळ्याविरोधात मौन धारण केलेल्या भाजप सरकारच्या विरोधात आज राजभवनावर काँग्रेसच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजारोंच्या संख्येने सामील झाले.
अदानीच्या घोटाळ्यावर पडदा टाकून प्रकरण दडपू पाहणाऱ्या मोदी सरकारचा यावेळी कडाडून विरोध करण्यात आला.
Discussion about this post