पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी येरवड्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरून नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल. या भागातील वाहतूक २१ एप्रिलपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
येरवड्यातील डाॅ. आंबेडकर पुलावरून तारकेश्वर मंदिरमार्गे वाहने नगर रस्त्याकडे जातात. आवश्यकता भासल्यास पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. मेट्रोच्या कामासाठी डाॅ. आंबेडकर पुलावरून नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत दररोज रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. २१ एप्रिलपर्यंत दररोज रात्री या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास डाॅ. आंबेडकर पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
Discussion about this post