व्हीएसआरएस मराठी न्युज –चीनमध्ये कोरोना हाहाकर माजवला असताना केंद्र सरकारही कोरोनाबाबत सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकाराना नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
विमानतळावरही प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक महाराष्ट्रातील मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील मंदिर प्रशासनांनी मास्कबाबत नियमावली बनवण्यास सुरुवात केली आहे.
परदेशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीनंतर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र भाविकांना अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्तीचा होणार आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानाने गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून गणेशभक्तासांठी पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहेत.
तानाजी सावंत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाची, आरोग्य शिक्षण विभागाबरोबरच सर्वांची एकत्र बैठक घेतली. या बैठकीत काही निर्देश देण्यात आले आहेत. बीएफ ७ हा नवीन व्हेरीएंट आलेला आहे, आधीच्या ओमायक्रॉनसारखा असूनफार गंभीरनाही.भारतात चार रूग्ण आहेत, त्यामध्ये गुजरात आणि ओरिसा राज्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात अद्याप रुग्ण आढळलेला नाही.
गर्दीच्या ठिकाणीमास्कचावापर,लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत.
आरोग्यमंत्री म्हणाले की, ओमायक्रॉन बाधित एक रूग्ण हा चार जणांवर परिणाम करत होता. मात्र या व्हेरिएंटचा वेग थोडा जास्त आहे, या व्हेरिएंटचा एक रूग्ण हा दहा जणांवर परिणाम करतो, अशी माहिती आहे. त्यामुळे भीती नको पण काळजी घ्या. चीनमधील बीएफ ७ हा व्हेरिएंट पूर्वी भारतात आढळलेला आहे, त्यामुळे या व्हेरिएंटमुळे भीती बाळगण्याची गरजनाही.वरिष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. पंचसूत्रीचा वापर, पूर्वीप्रमाणेच टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि वॅक्सीनेशन या पद्धतीच्या पंचसूत्रीचा अवलंब आपण केला पाहिजे. अशा पद्धतीचं मार्गदर्शक तत्व हे आजच्या मार्गदर्शनानंतर आणि कालही आम्ही आमच्या संपूर्ण विभागाला दिले आहेत. अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
Discussion about this post