व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई –स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 21 मार्च रोजी होणार आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी संपल्यानंतर आता न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण आणि वॉर्डरचनेला आक्षेप घेणार्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावर 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु ती झाली नाही. त्यानंतर 14 मार्च रोजी ही सुनावणी ठेवण्यात आली. मात्र त्याही दिवशी सुनावणी न होताच पुढची तारीख पडली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या याचिकेवर सत्तासंघर्षाची सुनावणी संपल्यानंतरच 21 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे जात आहे. त्यामुळे आता 21 मार्चला तरी सुनावणी होणार का? निवडणुकांचा मार्ग कधी मोकळा होणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
Discussion about this post