व्हीएसआरएस मराठी न्युज -राहुल गांधी खासदारकी रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘राहुल गांधींवर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई ही राज्यघटनेच्या मूळ रचनेलाच धक्का लावणारी आहे.
लोकशाही मूल्य पायदळी तुडवणारी आहे. आपल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे’, असं शरद पवार या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, इंदिरा गांधीजींबद्दल अशाप्रकारे तत्कालीन सरकारने घेतलेली भूमिका जनतेला पटली नव्हती. इंदिरा गांधीना आणीबाणीच्या कारणाने 1977 साली पराभूत केले त्यांनाच 1980 साली प्रचंड बहुमताने देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्याचे काम देशातील जनतेने लोकशाहीच्या मार्गाने केले. त्यामुळे आताच्या काळात ज्या घटना घडत आहेत ते सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत, असे स्पष्ट बजावत राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही प्रतिक्रिया नोंदविली आहे त्यांनी ट्वीट करून म्हटले आहेकी,’ माझ्या प्रिय नागरिकांनो, या देशाच्या रहिवाशांनो, आजच्या प्रकारानं देशाच्या राजकारणाची लाज वाटावी अशी परिस्थिती आहे.
जो काही प्रकार झाला आहे त्याला काय म्हणावे असा प्रश्न आहे. अतिशय हिणकस आणि किळसवाण्या गोष्टीनं मनाला खूप वेदना झाल्या आहेत.राजकीय क्षेत्र किती वेगळ्या थराला गेले आहे हे दिसून आले आहे. आणि आपण अजनुही शांत बसणार असाल तर पुढे याबाबत किंमत मोजावी लागेल , वेळ गेलेली नाही. देशासाठी बोलण्याची वेळ आली आहे. अशा शब्दांत प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Discussion about this post