व्हीएसआरएस मराठी न्युज –आजच्या दिवशी विविध मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी पक्षानं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं.
तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे विरोधक देखील शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यावरुन आक्रमक झाले आहे. विरोधकांनीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात निरमा आंदोलन केलं. नेत्यांच्या फोटोला निरम्याने आंघोळ घालत घोषणाबाजी देण्यात आली.
सत्तेतील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटले आहे. भ्रष्टाचारी लोकांना निरम्याने स्वच्छ करण्याचे काम आम्ही केले. हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही केले. ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले ते आज भाजपमध्ये गेले आहेत. भाजपमध्ये गेल्यामुळं ते पतीत पावन झाल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं.
Discussion about this post