व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) च्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयासह त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
तसेच द्रौपदी मुर्मु यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी राष्ट्रपती मिळाली आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासून द्रौपदी मुर्मु यांचा विजय निश्चित मानला जात होता.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी म्हणजे 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 98.90 मतदान झालं. 727 खासदार आणि 9 आमदारांसह एकूण 736 लोकप्रतिनिधींना संसद भवनात मतदानाला परवानगी देण्यात आली होती. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. 25जुलै ला त्या आपला शपथविधी घेतील.
र्द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. द्रौपदी मुर्मु य शिक्षिका असून त्यांनी 1997 मध्ये नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या भाजपच्या तिकिटावर मयूरभंज मध्ये रायरंगपूरमधून दोन वेळा आमदार होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या.
राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजपा आमदारांच्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या एकत्रित बैठकीत द्रौपदी मुर्मु यांना राज्यातून 200 मते मिळतील, असा अंदाज एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यत भाजपा 106 , शिंदे गट 50 असे मिळून 170 जण होते. तसेच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदारांची 16 मतेही राष्ट्रपती निवडणुकीत मूर्मुंना मिळाली होती. हा सगळा आकडा 185 च्या आसपास जातो. 200 चा आकडा शिंदे यांनी सांगितला होता. त्यामुळे त्यांच्या अपक्षेप्रमाणे १६ मते मिळतील असे वाटत होते .पण मुर्मू यांना महाराष्ट्रातून १८१ आमदारांची मतं मिळाले हे स्पष्ट झाले.
Discussion about this post