व्हीएसआरएस मराठी न्युज –निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्याने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धक्का भेटला.
यानंतर आयोगाने दोन्ही गटाला एक दिवसाची मुदत दिली होती. अशातच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग यांच्याकडे ३ चिन्हे आणि नावे दिले असून निवडणूक आयोगाने आणखीन एक धक्का दिला आहे.
उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं उद्धव ठाकरे यांच्याकडून ठरवण्यात आली आहे. तसेच, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , शिवसेना प्रबोधनकार ठाकरे , ही नावं देण्यात आली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने आता शिवसेना हे नावच गोठवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
चिन्ह गोठवल्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचं अस्थित्व काही नाही. निवडणूक आयोगानं चिन्ह गोठविलं. हा मुद्दा गैर आहे. जे अर्ज करतात ते अंधेरीतील निवडणूक लढविणार आहेत का? भाजप निवडणूक लढविणार नाही. पण, हा भाजपचा अजेंडा आहे. अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली. चिन्ह गोठविलं पण, रक्त पेटविलं आमचं. या सगळ्यानं आम्ही घाबरणार नाही, असं ते म्हणाले.
Discussion about this post