व्हीएसआरएस न्युज पिंपरी- देहू आळंदी परिसरामध्ये आषाढी पायी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन, गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २८ जून ते ०४ जुलै पर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
या २८ जून ते ०४ जुलै कालावधीमध्ये देहू, आळंदी मधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक राहणार बंद राहणार आहे. या कालावधीत देहू आळंदीकडे येणारी खासगी तसेच सरकारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास, यात्रीभवन, लॉज, हॉटेल व मठात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध करण्यात आला आहे.
दि. २८/०६/२०२१ ते दि. ०४/०७/२०२१ या कालावधीत धर्मशाळा, मठ, भक्तनिवास, यात्रीभवन, हॉटेल, लॉजेस इत्यादीमध्ये भाविक / नागरिक यांना वास्तव्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
Discussion about this post