व्हीएसआरएस मराठी न्युज –
मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 6,857 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 64 हजार 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53टक्के आहे.
राज्यात आज 286 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 93 हजार 479रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (44), हिंगोली (33), यवतमाळ (6), गोंदिया (50), चंद्रपूर (33), गडचिरोली (801) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भंडाऱ्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 677 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 73,69, 757 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,82, 914 (13.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,88,537 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,364व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Discussion about this post