व्हीएसआरएस न्युज दिल्ली संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी (Parliament Monsoon Session) कॉंग्रेसच्या संसदीय गटाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे काम प्रभावी आणि सोयीस्कर करण्यासाठी दोन्ही सभागृहांत पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी निश्चित केली आहे.
यात त्यांनी नेत्यांच्या ज्येष्ठतेचा क्रम कायम ठेवला आहे. सोनिया गांधी यांनी अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेत पक्षाचे नेते म्हणून पुन्हा नियुक्त केले आहे, तर गौरव गोगोई यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, के. सुरेश हे मुख्य सचेतक असतील, तर लोकसभेत रवनीतसिंग बिट्टू आणि मणिकम टागोर हे पक्षाचे व्हीप असतील. त्याचबरोबर शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनाही या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेचे सभागृहनेते आणि आनंद शर्मा यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंबिका सोनी, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह आणि केसी वेणुगोपाल यांच्यासमवेत पक्षाने जयराम रमेश यांना राज्यसभेवर मुख्य सचेतक म्हणून नेमले आहे. सोनिया गांधी यांनी जारी केलेल्या दिशानिर्देशात असे म्हटले आहे की, सीपीपीचे अध्यक्ष म्हणून मी संसदेच्या दोन्ही सभागृहांत आमच्या पक्षाच्या प्रभावी कामकाजाची सोय व खात्री करण्यासाठी गटांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. हे गट सत्रादरम्यान दररोज आणि सत्रादरम्यानही भेटू शकतात.
जोपर्यंत संसदेच्या मुद्द्यांचा प्रश्न आहे, आवश्यक असल्यास या सर्व गटांच्या संयुक्त बैठकादेखील बोलविल्या जाऊ शकतात. राज्यसभेचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे संयुक्त बैठकीचे समन्वयक असतील. सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यापूर्वी रविवारी विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. ज्यामध्ये शेतकरी आंदोलन, खासगीकरण आणि देशद्रोहाच्या कायद्यांच्या कायदेशीरपणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीसह अनेक विषयांवर केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
Discussion about this post