व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. केंद्राच्या धोरणावर पटोले यांनी जोरदार टीका केली. ‘सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही.
त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे,’ असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
‘आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.
राज्यातील भाजप आणि विरोधी पक्षनेते आरक्षणाच्या प्रश्नावर खोटे बोलत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून उद्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी काँग्रेसच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
Discussion about this post