व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या ९ महिन्यांमध्ये विविध अपघातांमध्ये तब्बल २१० नागरिकांचा बळी गेला आहे.
सुमारे ३०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने वाढते आपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यक आहे. याकडे पार्थ पवार यांनी लक्ष वेधले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकासकामे अर्धवट असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने सुनियोजित पिंपरी-चिंचवड शहराचा कारभार बिघडून सुरू केलेली कामे अपूर्ण राहिली आहेत, अशी टीका करीत ”हिच का स्मार्ट सिटी” असा सवालही युवा नेते पार्थ पवार यांनी उपस्थित केला आहे.
Discussion about this post