व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-केंद्रातील मोदी सरकारने पुलवामा हल्ल्याच्या प्रसंगी दाखवलेल्या निष्काळजी पणाच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ”शर्म करो मोदी शर्म करो’ हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे करण्यात आले.
यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, ”काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा येथील जवानांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात जे सत्य देशातील नागरिकांसमोर मांडले यावरून सिध्द होते की केंद्रातील मोदी सरकार हे शहिदांच्या नावाने राजकारण करून सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या हल्ल्यामध्ये ४० जवान शहिद झाले परंतु मोदी सरकारने ३०० किलो RDX कोठून आणले त्याच पध्दतीने जवानांना विमानाची सुरक्षितता का देण्यात आली नाही. याबाबत चौकशी सुध्दा केंद्र सरकारने केली नाही आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हाही दाखल केला नाही. यावरून सिध्द होते की, पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित होता व त्याचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वापर करण्यात आला.
गौतम अदानी याच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कोणी गुंतविले आणि हा काळा पैसा कोणाचा आहे. याचे देखील उत्तर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी द्यायलाच पाहिजे. कारण भष्टाचाराच्या विरोधात JPC ची मागणी काँग्रेससहित देशातील सर्वच विरोधी पक्षांनी लावून धरलेली आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात राज्यभर ”शर्म करो मोदी शर्म करो” आंदोलने घेण्यात आली असून याबाबत चौकशी झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे. यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, आबा बागुल, चंदूशेठ कदम, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, मेहबुब नदाफ, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, अजित दरेकर, सुजात शेट्टी, संगीता पवार, रजनी त्रिभुवन, सुजित यादव, सुनिल घाडगे, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रदिप परदेशी,
लतेंद्र भिंगारे आदी उपस्थित होते
Discussion about this post