व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे ।पक्षीही सुस्वरें आळविती ।।१।।(संत तुकाराम)
आळंदीत माझी वसुंधरा अभियाना मार्फत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची
वृक्षारोपण कामगिरी लक्ष वेधी ठरत आहे.आळंदीत नगरपालिकेच्या जवळ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर,
चार नंबर गार्डन मध्ये व गार्डनच्या बाहेर,इंद्रायणी हॉस्पिटल जवळ काही प्रमाणात ओढ्यालगत,वारकरी संस्थेजवळ फुटपाथ वर अश्या विविध ठिकाणी आळंदी नगरपालिका व सेवाभावी संस्थे द्वारे वृक्षारोपण करण्यात आले आहे.रस्ता दुभाजकांची शोभा वाढवण्यासाठी छोटेसी झाडे ही लावण्यात आली आहे. फक्त आराधना येथील रस्ता वरील दुभाजकावरील काम बाकी असल्याची माहिती मिळते.
नदीपलीकडील इंद्रायणी नगर मध्ये इंद्रायणी नदी जवळ वृक्षारोपण केलेले वृक्ष मोठे झाले आहेत तसेच नगरपालिके तर्फे योग्य त्या नियोजना नुसार तेथील विकास काम केल्याने त्या परिसरात सकाळ व संध्याकाळी नागरिकांची वर्दळ वाढत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने सिद्धबेटात
असणारी सांडपाणी व त्यामुळे होणारी त्या परिसरात दुर्गंधी ही समस्या ड्रीनेज लाईन द्वारे सोडवल्याने व सद्यस्थितीत पूर्वी जिथे सांडपाणी व अस्वच्छता होती तो परिसर आता पूर्ण पणे स्वच्छ केला आहे.तिथे नगरपरिषदेच्या वतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवा भावी संस्था आज जागतिक पर्यावरणा दिना निमित्त वृक्षारोपण करणार आहे.वृक्षच आहेत हरित वसुंधरेचे प्राण,करू त्यांचे संवर्धन,राखू पर्यावरणाची शान
हे आळंदी नगरपरिषदे तर्फे सोशल मिडिया वर टाकलेले घोषवाक्य अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.सध्या भागीरथी कुंड व कुबेर गंगा कुंड स्वच्छतेचे काम करून ही नगरपरिषद ईतर सेवा भावी संस्था त्यांच्याकडे लक्ष वेधत आहेत.
पावसाळ्या नंतर लावलेल्या वृक्षांची देखभालिची काळजी घेण्यात यावी व वृक्षांकडे दुर्लक्ष करू नये अशी प्रतिक्रिया काही स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
Discussion about this post